You know about free temple movement....
जेव्हा मी अकरावी/बारावीत असताना हॉस्टेल मध्ये विविध राजकीय,सामाजिक धार्मिक विषयावर चर्चा व्हायच्या तेव्हा आमची राजकीय सामाजिक मते अतिशय सुस्पष्टरित्या मांडायचो परंतु धार्मिक मात्र आम्हाला काहीच माहीत नसायच.. उदा. साधं राम कृष्ण याबद्दल ही नसायचं(यापूर्वीच रामायण, महाभारत मालिका होऊन गेल्या होत्या)आणि जे आमचे आई वडील इ.सांगायचे ते तर कुठं पुस्तकात सोडा मेन स्ट्रीम मीडिया मधे सुद्धा नसायचं उदा. भैरवनाथ ,खंडोबा, तुळजाभवानी प्रथा, परंपरा.जो तो स्वतःच्या बुध्दीने सांगेल ते सत्य मानत चालायाच.. अशी परिस्थिती होती...
याचाच अर्थ आपल्या सरकारने आपल्या अशा शिक्षणाची जबाबदारी घेतली नव्हती. मग सरकारने अशा प्रकारे शिक्षण देऊ शकणाऱ्या संस्था जसे की मंदिरे यांवर मात्र स्वतः होऊन सरकारने ताबा घेतला होता. देशातील अल्पसंख्यांक समुदायाच्या अशा शिक्षणाला प्राधान्य तसेच मदत करणाऱ्या सरकारने जगातील अल्पसंख्यांक (आता जागतिकीकरण झाले आहे) समाजाप्रती असे पाऊल उचलून एका समाजाला धार्मिक शिक्षणात पंगू ठेवणे नक्कीच विचार करणारे ठरू शकते.
त्यामुळे असं झालं की आम्हाला आमच्या पूर्वजांचा अभिमान वाटेल असं काही एकायलाच मिळालं नाही आता मात्र मी जेव्हा इतिहासाचा अभ्यास पदवी मिळवण्यासाठी केला तेंव्हा बरेच असे धागे दोरे समोर आले त्यातून आपली संस्कृती किती महान आहे समाजिकिकरण किती उच्च दर्जाचे होते पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट समजायला लागले. त्यातूनच आम्हाला निगेटिव्हचं जास्त का सांगितलं गेलं तेही समजलं.
झाले गेले विसरून जाऊ... परंतु आता तरी मंदिरांना स्वतंत्र देऊन मंदिरांनाद्वारे अशा प्रकारे शिक्षण देऊन एक उच्च मूल्य ध्येय असणारा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.