आजच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण, परीक्षेची भीती, पालकांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षांचे ओझे, आणि भविष्याची चिंता, मनाची चंचलता या गोष्टींचा मोठा प्रभाव दिसून येतो. अनेकदा विद्यार्थी खूप मेहनत करतात, परंतु केवळ नकारात्मक विचार, आत्मविश्वासाचा अभाव आणि मानसिक ताणामुळे