शैक्षणिक बातम्या

मराठी भाषा दिवस

मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो. मराठी आपली मातृभाषा आहे.मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे.

सम व विषम संख्या

सम व विषम संख्या
काही महत्त्वाची उदाहरणे नमुना
नमुना 1

उदा. X ही विषम संख्या आहे, तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती?

X+3
X+2
X-2
X-1
उत्तर : X+2

नियम:
1) विषम संख्येत 2 मिळविल्यास पुढील संख्या विषम संख्या मिळते.
2) विषम संख्येत 1 मिळविल्यास पुढील संख्या सम संख्या मिळते.
3) सम संख्येत 2 मिळविल्यास पुढील संख्या सम संख्या मिळते.
4) सम संख्येत 1 मिळविल्यास पुढील संख्या विषम संख्या मिळते.
नमूना दूसरा :

उदा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने गुणाकार सम संख्या येईल?

231
233
235
232
उत्तर : 232

सूत्र :
 विषम संख्या × सम संख्या = सम संख्या
उदा. 232 ही सम संख्या × 3 ही विषम संख्या = 696 ही सम संख्या येईल.
नमूना तिसरा :

उदा. 40 ते 50 दरम्यानच्या विषम संख्यांनी बेरीज किती?

25
180
225
405
उत्तर : 225

स्पष्टीकरण :
40 ते 50 दरम्यानच्या विषम संख्या = 41, 43. 45, 47, 49 यांची सरासरी = 45 ही मधली संख्या
एकूण बेरीज = सरासरी × एकूण संख्या (5) = 45 × 5 = 225   किंवा
क्रमश: संख्यांची बेरीज = पहिली संख्या + शेवटची संख्या / 2 × एकूण संख्या
= 41+49 / 2 × 5= 90 / 2 × 5
नियम : क्रमश: 10 नैसर्गिक संख्यांमध्ये 5 चा फरक असतो.
:: 1 ते 50 मध्ये 5 × 5 = 25 चा फरक येईल.
नमूना चौथा :

उदा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांत 1 हा अंक किती वेळा येतो?

21
19
20
18
उत्तर : 21

नियम :
1) 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात 1 हा अंक 21 वेळा येतो.
2) 0 हा अंक 11 वेळा येतो व राहिलेले 2 ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात.
3) दोन अंकी संख्येत 1 ते 9 अंक प्रत्येकी 19 वेळा येतात.
4) 1 ते 9 या प्रत्येक अंक असलेल्या दोन अंकी प्रत्येकाच्या 18 संख्या असतात.

Free temple movement मंदिरे मुक्ति चळवळ

You know about free temple movement....
जेव्हा मी अकरावी/बारावीत असताना हॉस्टेल मध्ये विविध राजकीय,सामाजिक धार्मिक विषयावर चर्चा व्हायच्या तेव्हा आमची राजकीय सामाजिक मते अतिशय सुस्पष्टरित्या मांडायचो परंतु धार्मिक मात्र आम्हाला काहीच माहीत नसायच.. उदा. साधं राम कृष्ण याबद्दल ही नसायचं(यापूर्वीच रामायण, महाभारत मालिका होऊन गेल्या होत्या)आणि जे आमचे आई वडील इ.सांगायचे ते तर कुठं पुस्तकात सोडा मेन स्ट्रीम मीडिया मधे सुद्धा नसायचं उदा. भैरवनाथ ,खंडोबा, तुळजाभवानी प्रथा, परंपरा.जो तो स्वतःच्या बुध्दीने सांगेल ते सत्य मानत चालायाच.. अशी परिस्थिती होती... 
याचाच अर्थ आपल्या सरकारने आपल्या अशा शिक्षणाची जबाबदारी घेतली नव्हती. मग सरकारने अशा प्रकारे शिक्षण देऊ शकणाऱ्या संस्था जसे की मंदिरे यांवर मात्र स्वतः होऊन सरकारने ताबा घेतला होता. देशातील अल्पसंख्यांक समुदायाच्या अशा शिक्षणाला प्राधान्य तसेच मदत करणाऱ्या सरकारने जगातील अल्पसंख्यांक (आता जागतिकीकरण झाले आहे)  समाजाप्रती असे पाऊल उचलून एका समाजाला धार्मिक शिक्षणात पंगू ठेवणे नक्कीच विचार करणारे ठरू शकते. 
त्यामुळे असं झालं की आम्हाला आमच्या पूर्वजांचा अभिमान वाटेल असं काही एकायलाच मिळालं नाही आता मात्र मी जेव्हा इतिहासाचा अभ्यास पदवी मिळवण्यासाठी केला तेंव्हा बरेच असे धागे दोरे समोर आले त्यातून आपली संस्कृती किती महान आहे समाजिकिकरण किती उच्च दर्जाचे होते पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट समजायला लागले. त्यातूनच आम्हाला  निगेटिव्हचं जास्त का सांगितलं गेलं तेही समजलं.
झाले गेले विसरून जाऊ... परंतु आता तरी मंदिरांना स्वतंत्र देऊन मंदिरांनाद्वारे अशा प्रकारे शिक्षण देऊन एक उच्च मूल्य ध्येय असणारा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.

दिनदर्शिका(दिलेल्या तारखेचा वार काढणे)

वारांचे कोड
रविवार- 0
सोमवार 1
मंगळवार 2
बुधवार 3
गुरुवार 4
शुक्रवार 5
शनिवार 6
महिन्यांचे कोड
0 मे
1 ऑगस्ट
2 फेब्रुवारी मार्च नोव्हेंबर
3 जून
4 सप्टेंबर डिसेंबर
5 एप्रिल जुलै
6 जानेवारी ऑक्टोबर
शतकांची कोड
2000 - 2099.  0
1900 ते 1999  1
रीत
तारीख+महिन्याचा कोड+साल+(साल/4)+शतकाचा  कोड या त्यांच्या बेरीज ला सातने भागावे, जी बाकी राहील ती संख्या वारांचा कोड समजावी , त्यावरून वार सांगावा.
उदाहरणार्थ:
15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता?
-> (15+1+47+11+1)/7
= 75/7
बाकी 5 राहील 
म्हणून 5 हा कोड असलेला वार म्हणजेच शुक्रवार
म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी शुक्रवार होता




परिसीमन आयोग

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदारसंघांच्या सीमा निश्चित करण्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम 82 अन्वये केंद्र सरकार द्वारा परिसीमन आयोग गठित केला जातो.
जम्मू काश्मीर लडाख या केंद्रशासित प्रदेशासह ईशान्येकडील चार राज्य मनिपुर, आसाम, अरुणाचल प्रदेश व नागालँड या प्रदेशांसाठी मतदार संघाची पुनर्रचना करण्यासाठी परिसीमन आयोग सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गठित केला आहे.
परिसीमनचा मुख्य उद्देश देशातील सर्व नागरिकांना समान प्रतिनिधित्वाचा हक्क प्रदान करणे होय.

एक छान अनुभव

एक छान अनुभव जो मी स्वत: आजही घेत आहे,  तुमच्यासाठी पाठवत आहे. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. नुकसान अजिबात नाही. 😊  रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत....  याचं उत्तर माझ्या एका मित्राकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. तो म्हणाला की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काहीच नाही' असं म्हटलं की तो, 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायचा.  मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. तोपण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायचा.  काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला , अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्याच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायoचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.  तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. जसं आपण बंद असलेल्या मंदिरासमोरून जातानाही 'आत देव आहे' या विश्वासाने नाही का नमस्कार करतो......... तसं या प्रयोगावर पण विश्वास करून बघा.  अट फक्त एकच, की तुम्ही  'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तरं दिलेच पाहिजे....

चांगल्या गोष्टी वाढल्या पाहिजेत.



मनोहर पर्रिकर देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या गावच्या कलिंगडांची सांगितलेली गोष्ट भरपूर काही शिकवणारी आहे. कलिंगडातून समजावला आयुष्याचा अर्थ मी गोव्यातील पारा गावचा. त्यामुळे आम्हाला सगळे पर्रिकर बोलतात. माझ गाव कलिंगडाच्या शेतीसाठी प्रसिद्ध होते. मी लहान असताना आमच्या गावातील शेतकरी मे महिन्यात कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचे. जास्तीत जास्त मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बोलावले जायचे. काही वर्षांनी मी इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी आयआयटी मुंबईला गेलो. साडेसहा वर्षांनी जेव्हा मी पुन्हा गावी गेलो. त्यावेळी मी कलिंगड घेण्यासाठी बाजारात गेलो. त्यावेळी तिथे छोटया आकाराची कलिंगड मला दिसले. जो शेतकरी कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचा त्याला भेटण्यासाठी मी गेलो. त्यावेळी सूत्र त्याच्या मुलाच्या हाती होती. त्याचा मुलगा कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचा पण त्यात फरक पडला होता. ज्यावेळी त्या मुलाचे वडिल आम्हाला कलिंगड खायला द्यायचे त्यावेळी कलिंगडाच्या बिया एका भांडयात जमा करायला ते आम्हाला सांगायचे. पुढच्या हंगामासाठी ते या बिया गोळा करायचे. आम्ही त्यांच्यासाठी बिनपगारी बालमजूर होतो. ते स्पर्धेसाठी सर्वोत्तम कलिंगड ठेवायचे त्यामुळे पुढच्या हंगामात अधिक मोठया आकाराचे चांगले कलिंगड मिळायचे. पण त्यांच्या मुलाने जेव्हा व्यवसाय संभाळला तेव्हा मोठया आकाराच्या कलिंगड विक्रीतून जास्त पैसा मिळत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे मोठी कलिंगडे तो बाजारात विकायचा आणि छोटी कलिंगडे स्पर्धेसाठी ठेवायचा. त्यामुळे त्या बियांमधून तयार होणा-या कलिंगडचा आकार छोटा असायचा. जशी वर्ष पुढे सरकत गेली तसा कलिंगडाचा आकार छोटा होत गेला. कलिंगडामध्ये एका पिढीमध्ये एका वर्षाचे अंतर असते. सातवर्षात परामधील सर्वोत्तम कलिंगड संपलेले होते. माणसांमध्ये २५ वर्षानंतर एक पिढी बदलते. त्यामुळे आपल्याला पुढच्या २०० वर्षांनी आपण मुलांना शिकवताना काय चूक केली ते शोधावे लागेल. आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगली शिकवण दिली नाही तर, कलिंगडासारखेच आपल्या बाबतीत घडू शकते.