शैक्षणिक बातम्या

लेखक शिवाजी सावंत यांच्या ' मृत्युंजय ' या कादंबरीचा स्वैर सारांश आणि परीक्षण.

'मृत्युंजय'... हे मराठी साहित्यविश्वातील एक अनमोल रत्न आहे! शिवाजी सावंत यांनी या पुस्तकात कर्णाच्या आयुष्याची कहाणी इतकी सुंदर रंगवली आहे, की वाचताना तो आपल्यातलाच माणूस वाटायला लागतो.

रॉबर्ट कियोस्की यांच्या विचारांचे संकलन(' रिच डॅड पुअर डॅड' चे लेखक)

रॉबर्ट कियोस्की,जगभरात त्याच्या प्रभावी आर्थिक विचारांसाठी ओळखले जातात आणि आज मी त्यांचे काही खास विचार त्यांच्या प्रसिद्ध अवतरणांच्या माध्यमातून तुमच्यासोबत वाटणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जे काही बोलता, फक्त तेवढंच तुमच्या आयुष्याची दिशा ठरवत नाही, तर तुम्ही स्वतःला आतून काय सांगता, या गोष्टीला खूप महत्त्व आहे.

Whats your Dream लेखक: सिमोन स्क्विब या पुस्तकाचा स्वैर सारांश

मित्रांनो, चैतन्य या ब्लॉगवर तुमचं मनःपूर्वक स्वागत! कधीतरी स्वतःला विचारलंत का, तुझं खरं स्वप्न काय आहे? लहान असताना सगळे विचारतात, मोठे झाल्यावर काय व्हायचंय? पण जसजसा वेळ जातो, तसतसा हा प्रश्न कुठेतरी हरवून जातो. जबाबदाऱ्यांच्या गर्दीत आपण इतके गुंतून जातो की, स्वतःसाठी काहीतरी विचार करायचो? हेसुद्धा विसरून जातो.आज आपण सिमोन स्क्विब यांच्या 'Whats your Dream' या पुस्तकातील काही महत्त्वाच्या संकल्पना सविस्तरपणे समजून घेणार आहोत.

The Power of Now द पॉवर ऑफ नाऊ लेखक-इकोर्ट टॉले

एका स्टोइक विचारवंताकडे एक माणूस धावत आला आणि म्हणाला, "तुमच्या मुलाचा अपघात झाला आणि तो आता नाही राहिला." तो विचारवंत काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, "हो, मला माहीत होतं की तो अमर नव्हता. एका दिवसा त्याला जायचंच होतं." आता प्रश्न हा आहे की या दुःखद परिस्थितीत आपण आपल्या दृष्टिकोनला काय म्हणणार? काय या माणसाने दैवापुढे शरणागती पत्करली होती का? आज आपण एकार्ट टॉले यांच्या 'द पॉवर ऑफ नाऊ' या पुस्तकातील काही महत्त्वाच्या संकल्पना सविस्तरपणे शिकणार आहोत.

द आर्ट ऑफ रिस्क लेखक रिचर्ड हॅरिस The art of Risk पुस्तकाचा मराठी सारांश

तुम्हाला माहित आहे का, रिस्क घेणं म्हणजे फक्त हिंमत दाखवणं नाही, तर ते तुमच्या यशाचं गुपित असू शकतं. इथे आपण ''द आर्ट ऑफ रिस्क'(जोखीम घेण्याची कला) या रिचर्ड हॅरीस यांच्या पुस्तकाचा स्वैर सारांश पाहणार आहोत. यातून तुम्हाला, योग्य वेळी रिस्क घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य कसं बदलू शकता? हे समजेल.जर तुम्हालाही रिस्क तुमची ताकद कशी बनवायची हे जाणून घ्यायचं असेल, तर हा पूर्ण सारांश नक्की वाचा.

द 80/20 प्रिन्सिपल, लेखक रिचर्ड कोच पुस्तकाचा सारांश the 80/20 principal

मित्रांनो, कधी विचार केलाय का की काही लोक कमी खटपट करून सुद्धा जास्त बाजी मारतात, तर काही जण दिवस-रात्र राबून सुद्धा त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचू शकत नाहीत? काही उद्योग कमी साधनसामग्री असून सुद्धा इतरांपेक्षा दुप्पट वाढतात आणि काही लोक कायम अडचणीत असून सुद्धा आपलं आयुष्य आरामात कसं चालवतात? तुमच्या डोक्यात पण असे अनेक प्रश्न आले असतील ना? तर याचंच उत्तर आहे ८०/२० चा नियम.

द अल्केमिस्ट, लेखक - पाऊलो कोयलो The Alchemist पुस्तकाचा स्वैर सारांश

पाउलो कोएलो चे 'द अल्केमिस्ट'! खूप सुंदर पुस्तक आहे ! मला ते वाचताना एक वेगळीच ऊर्जा मिळाली होती. हे पुस्तक म्हणजे नुसतं वाचायचं नाही, तर अनुभवायचं आहे. एका साध्या मेंढपाळ मुलाची गोष्ट आहे, त्याचं नाव सॅंटियागो. त्याला एक स्वप्न पडतं आणि तो त्या स्वप्नाचा पाठलाग करायला तो घर सोडतो. त्याला इजिप्तच्या पिरामिडमध्ये खजिना सापडणार असतो.

वॉरन बफेट यांचे गुंतवणुकीचे सात नियम

वॉरेन बफेट जेव्हा दहा वर्षांचे होते, तेव्हा त्यांची ओमाहामधील ओफन बन्नी नावाच्या घोड्यांच्या शर्यतीच्या मैदानात उत्सुकतेने पाऊले पडायची. शर्यत संपल्यावर, लहानगा वॉरेन तिथे फिरकायचा आणि जमिनीवर फेकलेली तिकीटं शोधायचा.

सेल्फ इम्प्रूमेंट, लेखक - नॉर्मन टर्नर या पुस्तकाचा स्वैर सारांश


तुम्हीही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट शोधताय का? तुम्हाला रोज स्वतःला थोडं तरी चांगलं बनवायचंय का? जर हो, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे! आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, जे तुम्हाला तुमचं लाईफ सुधारण्यासाठी आणि दररोज स्वतःला डेव्हलप करण्यासाठी मदत करेल.
नमस्कार मित्रांनो! 'चैतन्य' ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे! आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, त्याचं नाव आहे 'सेल्फ इम्प्रूव्हमेंट', जे नॉर्मन टर्नर यांनी लिहिलं आहे.

बिलीव इन युवरसेल्फ, लेखक - जोसेफ मर्फी

नमस्कार मित्रांनो! 'चैतन्य' ब्लॉगवर तुमचं मनःपूर्वक स्वागत! आज आपण जोसेफ मर्फी यांच्या एका खास पुस्तकाबद्दल बोलणार आहोत - 'बिलीव्ह इन युवरसेल्फ' अर्थात 'स्वतःवर विश्वास ठेवा'.
आशिष, हा माणूस नेहमीच काहीतरी मोठं करण्याची इच्छा बाळगून होता.

द सायकॉलॉजी ऑफ मनी (पैशाच्या मानसशास्त्र) लेखक -मॉर्गन हावजेल पुस्तकाची संक्षिप्त समरी


मित्रांनो आजच्या  बुक समरीमध्ये मी तुम्हाला द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकातून आठ महत्त्वाचे पैशांचे नियम सांगणार आहे.
1)  पहिला नियम - तुम्हाला सगळं माहिती असतच असे नाही.

कॉफी कॅन इन्वेस्टींग, लेखक - सौरभ मुखर्जी, रक्षित रंजन, प्रणव उनियाल coffee can investing पुस्तकाचा सारांश

कल्पना करा की तुम्ही अशा जगात राहत आहात जिथे प्रत्येकजण झपाट्याने श्रीमंत होण्याच्या मागे धावत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लोक नफा मिळवण्याचे दररोज नवीन मार्ग शोधत असतात, परंतु सत्य हे आहे की बहुतेक लोकांना या गर्दीत फक्त तोटाच सहन करावा लागतो.

The Art Of Staying Focused - Value Of Attention And Concentration In Our Life एकाग्रता साधण्याची कला (एकाग्र राहण्याची कला) - आपल्या जीवनात लक्ष आणि एकाग्रतेचे मूल्य, लेखक - मॅट ग्रीन या पुस्तकाचा सारांश

           तुमचे मन हे एका वेड्या माकडासारखे आहे. जे न थांबता इकडे तिकडे उड्या मारत राहते, पण मी वचन देतो की, हा सारांश वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या माकडाला, म्हणजे तुमच्या मनाला, गुलाम बनवू शकता आणि त्याला तुम्हाला हवे ते करायला लावू शकता. मी स्वतः ते वापरून पाहिले आहे, तुम्हीही एकदा वापरून पहा. लक्ष केंद्रित करण्याची कला ही जादू नाही तर एक विज्ञान आहे.

सेल्फ डिसिप्लिन self discipline, लेखक - रे विडीन Ray Vaden

नमस्कार मित्रांनो, studyhelp बुक समरी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रे वीडेन यांच्या सेल्फ डिसिप्लिन या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. खरी स्वयं-शिस्त समजून घेणे ही कंटाळवाणी किंवा सैद्धांतिक गोष्ट नाही. हे जीवनाचे असे साधन आहे जे कोणत्याही व्यक्तीला  ते असाधारण बनवू शकते. जेव्हा आपण स्वयं-शिस्तीबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ फक्त वेळेवर उठणे, आपले काम करणे किंवा लक्ष विचलित न होऊ देणे , काही गोष्टी टाळणे असा होत नाही.

रिवायर हॅबिट्स( Rewire habits),लेखक -जो मॅके (Joe McKey)

तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? जर मी माझे आयुष्य पुन्हा डिझाइन करू शकलो तर, मी ते अशाप्रकारे जगेन? हा प्रश्न साधा नाही आणि त्याचे उत्तर आणखी कठीण आहे पण आपल्या सर्वांच्या मनात कुठेतरी हा प्रश्न गुंजतो, एक असंतोष, एक अस्वस्थता, जी म्हणते की काहीतरी बदलले पाहिजे; पण कुठून सुरुवात करावी? तुम्ही एक इन्स्पायर डायजेस्ट वाचत आहात.

स्टॉक मध्ये पैसे कसे कमवायचे How to Make money in stocks या पुस्तकाचा सारांश

तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक शेअर बाजारातून करोडो कसे कमवतात तर काही लोक नेहमीच तोट्यात राहतात शेअर्समधून पैसे कमवणे हा खरोखर नशिबाचा खेळ आहे का? की त्यामागे काही विज्ञान आहे, काही systemआहे का? जर तुम्हीही या प्रश्नांशी झुंजत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

मराठी भाषा दिवस

मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो. मराठी आपली मातृभाषा आहे.मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे.

सम व विषम संख्या

सम व विषम संख्या
काही महत्त्वाची उदाहरणे नमुना
नमुना 1

उदा. X ही विषम संख्या आहे, तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती?

X+3
X+2
X-2
X-1
उत्तर : X+2

नियम:
1) विषम संख्येत 2 मिळविल्यास पुढील संख्या विषम संख्या मिळते.
2) विषम संख्येत 1 मिळविल्यास पुढील संख्या सम संख्या मिळते.
3) सम संख्येत 2 मिळविल्यास पुढील संख्या सम संख्या मिळते.
4) सम संख्येत 1 मिळविल्यास पुढील संख्या विषम संख्या मिळते.
नमूना दूसरा :

उदा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने गुणाकार सम संख्या येईल?

231
233
235
232
उत्तर : 232

सूत्र :
 विषम संख्या × सम संख्या = सम संख्या
उदा. 232 ही सम संख्या × 3 ही विषम संख्या = 696 ही सम संख्या येईल.
नमूना तिसरा :

उदा. 40 ते 50 दरम्यानच्या विषम संख्यांनी बेरीज किती?

25
180
225
405
उत्तर : 225

स्पष्टीकरण :
40 ते 50 दरम्यानच्या विषम संख्या = 41, 43. 45, 47, 49 यांची सरासरी = 45 ही मधली संख्या
एकूण बेरीज = सरासरी × एकूण संख्या (5) = 45 × 5 = 225   किंवा
क्रमश: संख्यांची बेरीज = पहिली संख्या + शेवटची संख्या / 2 × एकूण संख्या
= 41+49 / 2 × 5= 90 / 2 × 5
नियम : क्रमश: 10 नैसर्गिक संख्यांमध्ये 5 चा फरक असतो.
:: 1 ते 50 मध्ये 5 × 5 = 25 चा फरक येईल.
नमूना चौथा :

उदा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांत 1 हा अंक किती वेळा येतो?

21
19
20
18
उत्तर : 21

नियम :
1) 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात 1 हा अंक 21 वेळा येतो.
2) 0 हा अंक 11 वेळा येतो व राहिलेले 2 ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात.
3) दोन अंकी संख्येत 1 ते 9 अंक प्रत्येकी 19 वेळा येतात.
4) 1 ते 9 या प्रत्येक अंक असलेल्या दोन अंकी प्रत्येकाच्या 18 संख्या असतात.

Free temple movement मंदिरे मुक्ति चळवळ

You know about free temple movement....
जेव्हा मी अकरावी/बारावीत असताना हॉस्टेल मध्ये विविध राजकीय,सामाजिक धार्मिक विषयावर चर्चा व्हायच्या तेव्हा आमची राजकीय सामाजिक मते अतिशय सुस्पष्टरित्या मांडायचो परंतु धार्मिक मात्र आम्हाला काहीच माहीत नसायच.. उदा. साधं राम कृष्ण याबद्दल ही नसायचं(यापूर्वीच रामायण, महाभारत मालिका होऊन गेल्या होत्या)आणि जे आमचे आई वडील इ.सांगायचे ते तर कुठं पुस्तकात सोडा मेन स्ट्रीम मीडिया मधे सुद्धा नसायचं उदा. भैरवनाथ ,खंडोबा, तुळजाभवानी प्रथा, परंपरा.जो तो स्वतःच्या बुध्दीने सांगेल ते सत्य मानत चालायाच.. अशी परिस्थिती होती... 
याचाच अर्थ आपल्या सरकारने आपल्या अशा शिक्षणाची जबाबदारी घेतली नव्हती. मग सरकारने अशा प्रकारे शिक्षण देऊ शकणाऱ्या संस्था जसे की मंदिरे यांवर मात्र स्वतः होऊन सरकारने ताबा घेतला होता. देशातील अल्पसंख्यांक समुदायाच्या अशा शिक्षणाला प्राधान्य तसेच मदत करणाऱ्या सरकारने जगातील अल्पसंख्यांक (आता जागतिकीकरण झाले आहे)  समाजाप्रती असे पाऊल उचलून एका समाजाला धार्मिक शिक्षणात पंगू ठेवणे नक्कीच विचार करणारे ठरू शकते. 
त्यामुळे असं झालं की आम्हाला आमच्या पूर्वजांचा अभिमान वाटेल असं काही एकायलाच मिळालं नाही आता मात्र मी जेव्हा इतिहासाचा अभ्यास पदवी मिळवण्यासाठी केला तेंव्हा बरेच असे धागे दोरे समोर आले त्यातून आपली संस्कृती किती महान आहे समाजिकिकरण किती उच्च दर्जाचे होते पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट समजायला लागले. त्यातूनच आम्हाला  निगेटिव्हचं जास्त का सांगितलं गेलं तेही समजलं.
झाले गेले विसरून जाऊ... परंतु आता तरी मंदिरांना स्वतंत्र देऊन मंदिरांनाद्वारे अशा प्रकारे शिक्षण देऊन एक उच्च मूल्य ध्येय असणारा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.

दिनदर्शिका(दिलेल्या तारखेचा वार काढणे)

वारांचे कोड
रविवार- 0
सोमवार 1
मंगळवार 2
बुधवार 3
गुरुवार 4
शुक्रवार 5
शनिवार 6
महिन्यांचे कोड
0 मे
1 ऑगस्ट
2 फेब्रुवारी मार्च नोव्हेंबर
3 जून
4 सप्टेंबर डिसेंबर
5 एप्रिल जुलै
6 जानेवारी ऑक्टोबर
शतकांची कोड
2000 - 2099.  0
1900 ते 1999  1
रीत
तारीख+महिन्याचा कोड+साल+(साल/4)+शतकाचा  कोड या त्यांच्या बेरीज ला सातने भागावे, जी बाकी राहील ती संख्या वारांचा कोड समजावी , त्यावरून वार सांगावा.
उदाहरणार्थ:
15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता?
-> (15+1+47+11+1)/7
= 75/7
बाकी 5 राहील 
म्हणून 5 हा कोड असलेला वार म्हणजेच शुक्रवार
म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी शुक्रवार होता




परिसीमन आयोग

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदारसंघांच्या सीमा निश्चित करण्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम 82 अन्वये केंद्र सरकार द्वारा परिसीमन आयोग गठित केला जातो.
जम्मू काश्मीर लडाख या केंद्रशासित प्रदेशासह ईशान्येकडील चार राज्य मनिपुर, आसाम, अरुणाचल प्रदेश व नागालँड या प्रदेशांसाठी मतदार संघाची पुनर्रचना करण्यासाठी परिसीमन आयोग सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गठित केला आहे.
परिसीमनचा मुख्य उद्देश देशातील सर्व नागरिकांना समान प्रतिनिधित्वाचा हक्क प्रदान करणे होय.

एक छान अनुभव

एक छान अनुभव जो मी स्वत: आजही घेत आहे,  तुमच्यासाठी पाठवत आहे. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. नुकसान अजिबात नाही. 😊  रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत....  याचं उत्तर माझ्या एका मित्राकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. तो म्हणाला की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काहीच नाही' असं म्हटलं की तो, 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायचा.  मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. तोपण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायचा.  काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला , अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्याच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायoचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.  तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. जसं आपण बंद असलेल्या मंदिरासमोरून जातानाही 'आत देव आहे' या विश्वासाने नाही का नमस्कार करतो......... तसं या प्रयोगावर पण विश्वास करून बघा.  अट फक्त एकच, की तुम्ही  'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तरं दिलेच पाहिजे....

चांगल्या गोष्टी वाढल्या पाहिजेत.



मनोहर पर्रिकर देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या गावच्या कलिंगडांची सांगितलेली गोष्ट भरपूर काही शिकवणारी आहे. कलिंगडातून समजावला आयुष्याचा अर्थ मी गोव्यातील पारा गावचा. त्यामुळे आम्हाला सगळे पर्रिकर बोलतात. माझ गाव कलिंगडाच्या शेतीसाठी प्रसिद्ध होते. मी लहान असताना आमच्या गावातील शेतकरी मे महिन्यात कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचे. जास्तीत जास्त मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बोलावले जायचे. काही वर्षांनी मी इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी आयआयटी मुंबईला गेलो. साडेसहा वर्षांनी जेव्हा मी पुन्हा गावी गेलो. त्यावेळी मी कलिंगड घेण्यासाठी बाजारात गेलो. त्यावेळी तिथे छोटया आकाराची कलिंगड मला दिसले. जो शेतकरी कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचा त्याला भेटण्यासाठी मी गेलो. त्यावेळी सूत्र त्याच्या मुलाच्या हाती होती. त्याचा मुलगा कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचा पण त्यात फरक पडला होता. ज्यावेळी त्या मुलाचे वडिल आम्हाला कलिंगड खायला द्यायचे त्यावेळी कलिंगडाच्या बिया एका भांडयात जमा करायला ते आम्हाला सांगायचे. पुढच्या हंगामासाठी ते या बिया गोळा करायचे. आम्ही त्यांच्यासाठी बिनपगारी बालमजूर होतो. ते स्पर्धेसाठी सर्वोत्तम कलिंगड ठेवायचे त्यामुळे पुढच्या हंगामात अधिक मोठया आकाराचे चांगले कलिंगड मिळायचे. पण त्यांच्या मुलाने जेव्हा व्यवसाय संभाळला तेव्हा मोठया आकाराच्या कलिंगड विक्रीतून जास्त पैसा मिळत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे मोठी कलिंगडे तो बाजारात विकायचा आणि छोटी कलिंगडे स्पर्धेसाठी ठेवायचा. त्यामुळे त्या बियांमधून तयार होणा-या कलिंगडचा आकार छोटा असायचा. जशी वर्ष पुढे सरकत गेली तसा कलिंगडाचा आकार छोटा होत गेला. कलिंगडामध्ये एका पिढीमध्ये एका वर्षाचे अंतर असते. सातवर्षात परामधील सर्वोत्तम कलिंगड संपलेले होते. माणसांमध्ये २५ वर्षानंतर एक पिढी बदलते. त्यामुळे आपल्याला पुढच्या २०० वर्षांनी आपण मुलांना शिकवताना काय चूक केली ते शोधावे लागेल. आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगली शिकवण दिली नाही तर, कलिंगडासारखेच आपल्या बाबतीत घडू शकते.